एक अंधळा गावातील लोकांना
सतत म्हणे, मला प्रकाश दाखवा. त्याचा स्पर्श घडवा, मला त्याची चव चाखायची आहे.
गावातील कोणत्याही व्यक्तीला त्या अंध्ल्याचे समाधान करता येईना. सारेजण वैतागले
होते त्याच्या या मागणीला कोण तयार होत नव्हते. त्या गावात एकदा भगवान बुद्ध आले.
त्या आंधळ्याची हकीकत ऐकून बुद्ध म्हणाले, उपदेशाची नाही तर उपचारांची गरज आहे.
वैद्यांकडे न्या. त्याप्रमाणे आंधळ्याला वैद्यांकडे नेण्यात आले. त्याचा डोळ्यातील
मोतीबिंदू काढण्यात आला. तो माणूस आनंदाने नाचत बुद्धांजवळ गेला. बुद्ध म्हणाले,
आता मला प्रकाशाची चव, स्पर्श, ध्वनी हे सारे तू दाखव. तो माणूस म्हणाला, हे कसं
शक्य आहे? हे सारे आता मी जाणतो. पण दाखवू शकत नाही. बुद्ध म्हणाले, वेड्या माणसा,
सारे लोक तुला हेच सांगत होते पण तू ऐकत नव्हतास. तो माणूस म्हणाला, म्हणूनच
माझ्या डोळ्यावर उपचार झाले. त्याचं ऐकून गप्प राहिलो असतो तर अद्याप आंधळाच
राहिलो असतो.
तात्पर्य: सत्य मानले जाऊ
शकत नाही. ते जाणावे लागते. अनुभवावे लागते.